उरलेले सुरलेले राहिले नव्हते तेव्हाची ही गोष्ट - पु. शि. रेगे
उरलेले सुरलेले राहिले नव्हते तेव्हाची ही गोष्ट,
ओष्ठांनी सांगतां येईल येवढीच:
कांसवांच्या आसवांना एकदां आला महापूर
मूर लोकांच्या उजाड लोकप्रिय प्रदेशांत
पहिल्यानें वहिले लोक झपाझप तरुन गेले
मेले ते साहजिकच तरुन- न गेलेले. आतां कुणी तरी
अलबत्याने गलबतांची सोय करायला हवी होती:
मोतीं नव्हती का सामुद्रधुनीतून काढलीं जात?
पण शहाणपण लहानपणींच टळतें;
कळतें ते नंतर दुसरेंच कांहीं:
म्हणणारे अजूनही म्हणतात चमत्कारीक फ़रकानें,
तर्काने यांत कांहीं सुधारणा झाली असती.
-पु. शि. रेगे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment