"अतली वार रं!
कवयस्नी घंट्टी वाजी गईस्नं
बठ्ठं पोरं येई लागनसत शायमां
गुरुजी व्हाराला धाडनास मला
चाल जल्दी!"- किसू आंखना
तवय दिलप्या
"येवू रं, हागाला गयला तिमा
वाट लग्गी गई
जब्बर काम लिवां आयल्यात भो
मनी चड्डीमां
हागता-हागता बठ्ठ्या मारी टाकना
वसन लिखान पिखल र्हईत गयत अव
चड्डीबी बठ्ठी
किटा-
ईली
फ़ाटली
लिखा अन पिखलं
फ़ेकी देवाना इचार फ़िरी गयला पन
पव्वाला दुसरी चड्डी न्हा मिय न!"
"इतका उशीर रे!
केव्हाची घंटी वाजून गेलिये
सर्व पोरे केव्हाची आलीत शाळेत
गुरुजींनी बोलवायला पाठवलंय मला
लवकर चल!"-किसू म्हणाला.
तेव्हा दिलप्या-
"येतो रे! हगायला गेलो होतो म्हणून
उशीर झाला.
भयंकर उवा होत्या गड्या
माझ्या चड्डीत.
हगत हगत सर्व मारुन टाकल्या
तरी अंडी आणि बारीक पिल्लं राहूनच गेलीत आणि
चड्डीही सर्व
मळ-
लेली
फ़ाटकी.
अंडी आणि बारीक पिल्लं
फ़ेकून द्यायचा विचार मनात येऊन गेला होता , पं
घालायला दुसरी चड्डी नाही ना!"
-बाहरु सोनावणे
Showing posts with label भिलोरी बोलीतील कविता. Show all posts
Showing posts with label भिलोरी बोलीतील कविता. Show all posts
भिलोरी बोलीतील कविता-२ -बाहरु सोनावणे
"तो देख गिर्हन"
सांग बाप बेटला
तवय बेटा- "गिर्हन?
बापरे..!
बठ्ठाच गिई चालना
चांदबाबाला
तो राखोच.
न बाबा, कज्या ततायत बठ मानसं
तो बी आपनी गिर्हावर
ततयता व्हई?
-ती दिन आचू
भूखेच निलनलत
तवय तो खूष
ततयना व्हई, न बाबा!"
"ते बघ ग्रहण"
बाप मुलाला सांगतो
तेव्हा मुलगा म्हणे-"ग्रहण?
बापरे
सर्वच गिळून जात आहे
चांदोबाला
तो राक्षस.
आणि बाबा, का हैराण होऊन दु:खी होतात सर्व माणसं?
तो पण आपल्या ग्रहणावर
हैराण होऊन दु:खी होत असेल?
-त्या दिवशी आपण
उपाशीच झोपलो
तेव्हा तो खूपच
हैराण होऊन दु:खी होत असेल, न बाबा?"
-बाहरु सोनावणे
सांग बाप बेटला
तवय बेटा- "गिर्हन?
बापरे..!
बठ्ठाच गिई चालना
चांदबाबाला
तो राखोच.
न बाबा, कज्या ततायत बठ मानसं
तो बी आपनी गिर्हावर
ततयता व्हई?
-ती दिन आचू
भूखेच निलनलत
तवय तो खूष
ततयना व्हई, न बाबा!"
"ते बघ ग्रहण"
बाप मुलाला सांगतो
तेव्हा मुलगा म्हणे-"ग्रहण?
बापरे
सर्वच गिळून जात आहे
चांदोबाला
तो राक्षस.
आणि बाबा, का हैराण होऊन दु:खी होतात सर्व माणसं?
तो पण आपल्या ग्रहणावर
हैराण होऊन दु:खी होत असेल?
-त्या दिवशी आपण
उपाशीच झोपलो
तेव्हा तो खूपच
हैराण होऊन दु:खी होत असेल, न बाबा?"
-बाहरु सोनावणे
भिलोरी बोलीतील कविता-१ -बाहरु सोनावणे
"असे कज्या रं"
कोनी इचारना त
गालफ़टटे लाल व्हई जात,
न्हात कचूरी धाडीन कोंडी देत
ते काईबी करोत
एक शब्द न्हा काडना जोय, आपू-
तिस्नी विरुद्ध.
न्हा पटं तू, पाठ फ़िराई लेना जोयं
कदी खूब जीव्हरं वनी त
गांव सोडीन निंगी जाना जोयं
गुपचूप
कायबी सहन करवा
तव्वय आमीनी जमाना
आव्वल आंख
गरीबस्ला..!
"असं का हे बुवा!"
कोणी विचारलं तर
गालफ़डं लाल होऊन जातात
नाहीतर जेलात पाठवून कोंदुन देतात
ते काहीही करोत
एक शब्द उच्चारता कामा नये आपण
त्यांच्या विरुद्ध.
नसेल पटत तर, पाठ फ़िरवून घ्यायला हवी
बघितलं असेल तें विसरुन जायला हवम
जर जीवावर आलंच तर
गाव सोडून निघून जायला हवं
गुपचूप
काहीही सहन करावं,
तेव्हा आताचा जमाना
चांगलं म्हणतो
गरीबांना..!
-बाहरु सोनावणे
कोनी इचारना त
गालफ़टटे लाल व्हई जात,
न्हात कचूरी धाडीन कोंडी देत
ते काईबी करोत
एक शब्द न्हा काडना जोय, आपू-
तिस्नी विरुद्ध.
न्हा पटं तू, पाठ फ़िराई लेना जोयं
कदी खूब जीव्हरं वनी त
गांव सोडीन निंगी जाना जोयं
गुपचूप
कायबी सहन करवा
तव्वय आमीनी जमाना
आव्वल आंख
गरीबस्ला..!
"असं का हे बुवा!"
कोणी विचारलं तर
गालफ़डं लाल होऊन जातात
नाहीतर जेलात पाठवून कोंदुन देतात
ते काहीही करोत
एक शब्द उच्चारता कामा नये आपण
त्यांच्या विरुद्ध.
नसेल पटत तर, पाठ फ़िरवून घ्यायला हवी
बघितलं असेल तें विसरुन जायला हवम
जर जीवावर आलंच तर
गाव सोडून निघून जायला हवं
गुपचूप
काहीही सहन करावं,
तेव्हा आताचा जमाना
चांगलं म्हणतो
गरीबांना..!
-बाहरु सोनावणे
Subscribe to:
Posts (Atom)
