त्याच्याकडे काही होतं
ते त्यांना हवं होतं.
त्यांनी त्याला जंग जंग पछाडलं,
दाढीचा एकेक केस उपटला,
वृषणाला चाप लावले.
गुदद्वारी मिरच्यांची पूड घातली.
पण तो हूं की चूं करीना.
मग त्यांनी त्याला बाजारचौकात आणलं
नि सर्वासमक्ष त्याला गोळ्या घातल्या.
तो खाली कोसळला.
त्याच क्षणी त्याची जीभ
त्याच्या सदरयाच्या खिशातून खाली पडली
नि खारीसारखी तुरतुरत
झुडूपात निघून गेली
त्यांच्यासमक्ष...
-सदानंद रेगे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment