नाही
मला
काही
काही
करायचं
नाही
काही
म्हंजे
काहीसुद्धा
नाही
नाही
आकाश
पहायचं
नाही
चांदण्या
मोजायच्या
नाही
वारा
अंगावर घ्यायचा
नाही
पाऊस
झेलायचा
मला
उणं
व्हायचंय
मला
नेणीवेनं
निजायचंय
मला
मिटल्या अक्षरांनी
जागायचंय
मला
काही
काही
नकोय
मग हा
असा छळ
का
मांडलाहात?
शब्द
म्हणतात:
हेच लिही
हेच लिही
नि मग
काही
काही करु नको
कालत्रयी.
नुसतंच उणं
उण्यातून उणं
हातचं आलं उणं
उन्हातून
उण्म
तहानेतून
उणं
उन्हातान्हातून
उणं
-सदानंद रेगे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment