कागदावर लिहावी
दरवळणारी कविता.
कागद जाळून मग
करावी तिची रवेदार राख.
त्या राखेने घालावं
चराचराला गोपीचंदन स्नान.
सारया प्रश्नाचं अत्तर
अखेर एकत्रच असतं-
राखेच्या राखेच्या
आतातातात....
-सदानंद रेगे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment