विमान आले डुंबत डुंबत
अंधारातुन
आणि उतरले तीन प्रवासी
चिंचेच्या अर्ध्या पानावर.
एक म्हणाला,
’आज विसरलो नाक घरी मी’
नंतर दुसरा
’परवा माझे असेच झाले;
स्वस्थ झोपलो डोळे उघडुन
आणि भावली पळून गेली’
तिसरा वदला,
’अता दुधाचा प्रश्न न उरला,
काल नवी मधमाशी व्याली.’
इतक्यामध्ये
अंधाराच्या नाकावरती
एक काजवा येऊन बसला.
त्याला पाहुन ते म्हातारे
परस्परांच्या धरुनी शेंड्या
इतके हसले,
इतके चळले
उरलेल्या अर्ध्या
पानांतिल
दवबिंदूतच ते विरघळले
-विंदा करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
कृपया या कवितेचे रसग्रहण करावे
ReplyDelete