जुनी कॅलेंडरं घेऊन बसल्यावर
समजतं आपण किती निरर्थक भर्कटतो
निष्पर्ण झाडांतून सरकत जाणारा चंद्र
नदीत तरंगणारी इमारतींची प्रतिबिंबं
समुद्र आकाश टेकडया विजा सूर्य तारे
भावल्यांसारखी माणसे अन पावसाळे
हे सगळेच असतात पुन्हा पुन्हा येणारे
तरी क्षणांच्या चिमटीत पकडता आलं नाही
यातलं सगळंच आपल्याला
त्यांनी एकमेकाल दिलेल्या शिव्यांचाच
आपण अभ्यास केला इमान्दारीत
उगीच जबडे दुखावले प्रश्नांच्या बडबडीनी
अन पळ काढला खरी उत्तरं आली
तेव्हा भीतीने बसून राह्यलो
कवितेच्या टिकाऊ वळचणीला
बेमालूमपणे
-सलील वाघ
No comments:
Post a Comment