किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.
काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.
कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला!
- बा. सी. मर्ढेकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
सुंदर कविता , धन्यवाद. देवाला उद्देशून लिहिली असेल का ??
ReplyDelete